३४ दिवस पाऊस गायब

३४ दिवस पाऊस गायब
Published on
फोटो PRB26B64778 मानवत ः तहसीलदारांना निवेदन देताना केकरजवळा मंडळातील शेतकरी. ------------- पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्या केकरजवळा मंडळातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी मानवत, ता.६ (बातमीदार): ३४ ते ३५ दिवसांपासून पावसाने दिर्घ दडी मारल्याने केकरजवळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पीके डोळ्यांसमोर करपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून प्रशासनास निवेदन दिले. केकरजवळा मंडळातील सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद या पिकांना पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. वर्षभराची मेहनत, शेतीवर केलेला खर्च, घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक विवंचनेत सापडला आहे. प्रत्यक्ष पंचनामे, प्रत्यक्ष नुकसानभरपाई, तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. पावसाने पाठ फिरवल्याने मोठे नुकसान झाले असून शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने केकरजवळा मंडळातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करावेत, पात्र शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी ज्ञानेश्वर धोपटे, रितेश कदम, विष्णू हारके, विनायक वरखडे, शेषराव धोपटे, गजानन लाडाने, गणेश कौसले, योगेश धोपटे, गजानन धोपटे, नागेश आळसे, गणेश धोपटे, देविदास चव्हाण, आशिष लाडाने, मारोती साठे, सुरेश धोपटे, अमोल धोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com