आघाडी सरकारमुळे अल्पसंख्याक सुरक्षित - अशोक चव्हाण

शंभर मुलींसाठीच्या वसतिगृहाचे लातूरमध्ये लोकार्पण
Ashok Chavan
Ashok Chavan

लातूर : गेल्या काही वर्षांत अल्पसंख्याक समाजामध्ये असुरक्षिततेची भावना आहे. राज्यातही भाजपचे सरकार असताना जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या योजनांना खीळ घालण्यात आली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून या समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या समाजाच्या विकास योजनांवर महाविकास आघाडीचा भर आहे, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

येथील पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या आवारात अल्पसंख्याक समाजातील शंभर मुलींसाठीच्या वसतिगृहाचे रविवारी (ता. २७) चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजीमंत्री दिलीपराव देशमुख होते. पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार धीरज देशमुख, विक्रम काळे , अमर राजूरकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे आदी उपस्थित होते.

येथे २०१५ मध्ये या वसतिगृहाचे भूमिपूजन झाले. पण भाजपच्या काळात निधीच दिला नाही. त्यामुळे काम थांबले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चार कोटी रुपये खर्च करून ते बांधण्यात आले आहे. लातूर, नांदेडमध्ये विकासाची स्पर्धा आहे. अशीच स्पर्धा इतर जिल्ह्यांत असल्याने मराठवाड्यासाठी हे महत्त्वाचे आहे. मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे चव्हाण म्हणाले.

एशियन बँकेच्या निधीतून लातूरचा ‘बाय पास’

लातूर शहरासाठी बाय पासचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात येईल. त्याचे काम एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळणाऱ्या निधीतून करण्यात येईल, अशी माहिती चव्हाण यांनी येथे दिली. लातूर येथे नवनिर्मित सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता कार्यालयाचे उद्‍घाटन आणि जिल्ह्यातील ३७ रस्ते व पुलाचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com