छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाढणाऱ्या प्रदूषणामुळे २०२१-२०५० या कालावधीत तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील उन्हाळा ०.२५ ते ०.४२ अंशांनी, तर हिवाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशांनी तापमान वाढणार आहे. त्यामुळे थंडी कमी होणार आहे..उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील तापमान अधिक असेल, तर दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणातील तापमान तुलनेने कमी राहील, असा निष्कर्ष सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी ॲण्ड पॉलिसी या संशोधन संस्थेच्या जिल्हावार अभ्यासातून समोर आला. .संस्थेच्या अभ्यासानुसार, वायू प्रदूषणाच्या मध्यम टप्प्यात जालना येथे ८ दिवस, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाचे दिवस पाच दिवसांनी वाढणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जालना ६ दिवस, धाराशिव ५ दिवस, तर छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात २ ते ४ दिवस वाढण्याची शक्यता आहे. .पावसाळ्याचे दिवस वाढल्याचा परिणाम महापूर, शेती, वने, वन्यजीव, आरोग्य आणि विकासावर दिसून येणार आहे. गेल्या ३० वर्षांच्या तुलनेत पुढील २५ वर्षांत उन्हाळा व हिवाळ्यातील तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे..सरासरी पावसाच्या प्रमाणातही अशी होईल वाढछत्रपती संभाजीनगर - ९ ते १७ टक्के, जालना - ९ ते १६ टक्के, बीड - १७ ते २३ टक्के, हिंगोली - १८ ते २२ टक्के, परभणी - ७ ते १६ टक्के, धाराशिव - ८ ते १८ टक्के, लातूर - १३ ते १७ टक्के, नांदेड - ७ ते २३ टक्के.२०५० पर्यंत तापमान वाढीचा इशारा (अंश से.)अकोला २.५, अमरावती २.९, छत्रपती संभाजीनगर २.९, भंडारा २.६, बुलढाणा २.३, धुळे २.२, गोंदिया २.१, हिंगोली २.२, जळगाव २.५, जालना २.७, नागपूर २.२, नंदुरबार २.५, नाशिक २.४, वर्धा २.१, वाशीम २.३.तापमानवाढीचा अंदाज (अंश सेल्सिअसमध्ये)छत्रपती संभाजीनगर उन्हाळा : १.१ ते २.१ हिवाळा: १.४ ते २.३बीड उन्हाळा : १.२ ते १.६ हिवाळा : १.२ ते २.१हिंगोली उन्हाळा : १.२ ते २.२ हिवाळा : १.८ ते २.५जालना उन्हाळा : १.३ ते २.७ हिवाळा : १.१ ते २.६लातूर उन्हाळा : १.४ ते १.८ हिवाळा : १.० ते १.६नांदेड उन्हाळा : १.० ते २.० हिवाळा : १.१ ते २.४धाराशिव उन्हाळा : १.४ ते १.८ हिवाळा : १.३ ते १.९परभणी उन्हाळा : १.२ ते १.४ हिवाळा : ०.३ ते १.१.Tractor Accident : ट्रॅक्टर पलटून चालकाचा मृत्यू.केंद्रीय वने, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय, दिल्ली यांच्या मते, भारतातील हवामान जोखीम निर्देशांकात आपण सताव्या स्थानी आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात तिसऱ्या स्थानी आहोत. त्यामुळे हा अहवाल गंभीर धोक्याची सूचना देत आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रावर या बदलाचा विपरीत परिणाम होणार आहे.- प्रा. सुरेश घोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.