Manoj Jarange Maratha reservation hunger strike
esakal
-दिलीप दखणे
वडिगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी आमचा लढा सुरूच आहे. सरकार आमचा विश्वासघात करत आहे. मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही मागे हटणार (Maratha reservation latest update) नाही. ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून, या नोंदी रद्द करण्याचे सरकार षडयंत्र रचत असल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आज शनिवारी (ता. २९) अंतरवाली सराटी येथे बारावे आमरण उपोषण सुरू (Manoj Jarange 12th hunger strike at Antarwali Sarati) केले.