औरंगाबाद : अतिवृष्टीचा बंधाऱ्यांना तडाखा!

दुरुस्तीसाठी लागणार ३१ कोटींचा निधी
औरंगाबाद : अतिवृष्टीचा बंधाऱ्यांना तडाखा!
औरंगाबाद : अतिवृष्टीचा बंधाऱ्यांना तडाखा!sakal news
Updated on

औरंगाबाद : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका सिंचन विभागाला बसला असून, जिल्ह्यातील क्षतिग्रस्त पाझर तलाव व कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे आवश्यक झाले आहे. या नुकसानग्रस्त पाणी प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी तब्बल ३१ कोटींचा निधी अपेक्षित आहे.

मान्सून सुरु झाल्यापासून जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले. सात आणि २८ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीही झाली. यात जिल्ह्यातील पाझर तलाव व कोल्हापुरी बंधार्यांना मोठी हानी पोहोचली. याबाबत बुधवारी (ता.२९) जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंचन विभागाची बैठक घेत नुकसानीची माहिती घेतली.

यात एकूण ८४ प्रकल्पांना नुकसान पोहोचली असल्याचे सिंचन विभागाने दिलेल्या अहवालात म्हंटले आहे. याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी तब्बल ३१ कोटी तीन लक्ष ८० हजार रुपयांचा निधी लागणार आहे. तर तात्पुरत्या दुरुस्तीसाठी २७ लक्ष १५ हजार निधीची आकडेवारी सिंचन विभागाने मांडली आहे. क्षतिग्रस्त प्रकल्पांमध्ये औरंगाबाद तालुक्यातील चार, पैठण सात, फुलंब्री १०, गंगापूर एक, वैजापूर २८, कन्नड २८, सोयगाव तीन आणि सिल्लोड तालुक्यातील तीन प्रकल्प दुरुस्ती करणे आवश्यक आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com