

Chhatrapati Sambhajinagar
esakal
पैठण: जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणातील गोड्या पाण्यातील ताज्या मासळीला खवय्यांची मोठी पसंती असली, तरी बदलत्या हवामानाचा मोठा फटका सध्या मासेमारी व्यवसायाला बसत आहे. पहाटेचा गारठा आणि दुपारनंतर अचानक वाढणारा पारा यामुळे वातावरणात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम मासळीच्या उपलब्धतेवर झाला आहे. परिणामी, बाजारपेठेत मासळीची आवक लक्षणीय घटली आहे.