राज्यात हमी योजनेच्या कामात औरंगाबाद पहिल्या स्थानावर

जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तब्बल २५२ टक्के काम
National Rural Employment Guarantee
National Rural Employment Guaranteesakal

औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत जिल्हानिहाय मनुष्यदिवस निर्मितीचा तुलनात्मक निर्देशांक नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याने मागील वर्षाच्या तुलनेत २५२ टक्के काम करत राज्यामध्ये पहिले स्थान पटकाविले आहे. चालू वर्षात पाचपट अधिक कामे होईल याप्रमाणे नियोजन करावे अशा सूचना रोजगार हमी योजनेचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या आहेत.

मनरेगाअंतर्गत वैयक्तिक सिंचन विहिरी, गोठे, वृक्षलागवड, फळबाग लागवड्यासह इतर कामे केली जातात. गावपातळीवर मजुरांना १०० दिवस काम उपलब्ध व्हावे या दृष्टीने नियोजन केले जाते. दरम्यान १७ फेब्रुवारीपर्यंतचे जिल्हानिहाय मनुष्य दिवस निर्मितीचा तुलनात्मक अभ्यास केला असता मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी औरंगाबाद जिल्हा १०० टक्केच्या वर पोचला आहे. जिल्ह्याने २५२ टक्के एवढे काम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे तसेच सर्व तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

२४ लाख मनुष्यदिवस निर्मिती

जिल्ह्याला मनरेगाअंतर्गत २०२१-२२ मध्ये १३ लाख ५४ हजार मनुष्यदिवस कामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सद्यःस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये २ हजार ८४१ वैयक्तिक सिंचन विहिरी, दोन हजार २४३ गोठे व चार हजार ८४८ वृक्षलागवडींची कामे जिल्ह्यात सुरू आहेत. या सर्व कामांमधून आजपर्यंत २४ लाख मनुष्यदिवस निर्मिती झालेली आहे, जी उद्दिष्टांच्या २५२ टक्के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com