दिलासा! कृषी संबंधित दुकाने आता सायंकाळी सातपर्यंत राहणार सुरु

दिलासा! कृषी संबंधित दुकाने आता सायंकाळी सातपर्यंत राहणार सुरु
Summary

सद्य:स्थितीत कृषी हंगामाची व्याप्ती व कालमर्यादा विचारात घेता बी-बियाणे व कृषिविषयक साहित्य खरेदीकरीता गर्दी होऊ नये व शासन निर्देशानुसार कोविड-१९ प्रतिबंधक शिष्टाचाराचे पालन व्हावे.

औरंगाबाद : कोविडच्या (Corona) अनुशंगाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत सुधारित लॉकडाऊन (Lock Down) आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यात कृषी हंगाम (Agriculture Season) विचारात घेऊन कृषी संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती (Agriculture Producing Market Committee) हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत कृषी हंगामाची व्याप्ती व कालमर्यादा विचारात घेता बी-बियाणे व कृषिविषयक साहित्य खरेदीकरीता गर्दी होऊ नये. (Now Agriculture Related Shops Open From 7 Am To 7 PM In Aurangabad)

दिलासा! कृषी संबंधित दुकाने आता सायंकाळी सातपर्यंत राहणार सुरु
बनावट अकाऊंटवरुन माजी विभागीय आयुक्तांच्या नावाने पैशांची मागणी

शासन निर्देशानुसार कोविड-१९ प्रतिबंधक शिष्टाचाराचे पालन व्हावे म्हणून कृषी संबधीत दुकाने आणि त्यांच्याशी संबधीत आस्थापना तसेच, कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवडयातील सर्व दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेऐवजी यापुढे सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत सुरु ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (District Collector Sunil Chavan) यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com