उस्मानाबाद : बालविवाह प्रकरणी आठ जणांवर गुन्हा

लग्नानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.
बालविवाह
बालविवाहMedia Gallery

उस्मानाबाद : लग्नानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. यानंतर मुलीचा जाणीवपूर्वक बालविवाह लावण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अणदूर येथील एका मुलीचे वय १५.४ वर्षे असताना आई व वडिलांनी तीचा विवाह उतमी (कायापूर) येथील अजित बोंदर याच्याबरोबर लावला होता. हा विवाह ११ जून २०२० रोजी झाला होता. विवाहानंतर मुलगी गर्भवती राहिली. यानंतर आॅक्टोबर २०२१ महिन्यात तिचा मृत्यू झाला. सदरील मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही जाणीवपूर्वक हा बालविवाह लावला असल्याची तक्रार आता ग्राम विकास अधिकारी देविदास चव्हाण यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिली आहे.

बालविवाह
मालेगाव : चिखलीच्या इसमाचा मालेगावात खून

यावरून विवाह लावणाऱ्या पाच व्यक्तींसह लक्ष्मण घुगे, राम घुगे, सुरेखा बोंदर अशा आठ व्यक्तींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढील तपासात गुन्हा उस्मानाबाद (ग्रामीण) पोलिस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com