
परभणी : समाधानकारक पाऊस न झाल्याने परभणी, बीड जिल्ह्यातील खरिपाची अवस्था बिकट झाली. पिके जगविण्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून बुधवारी (ता. १६) एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.१५) मुंबईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या आवर्तनाचा जालना, परभणी, बीड जिल्ह्यांतील काही भागांतील शेतीला लाभ होईल.