
जायकवाडी : श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला ४२५ वर्षांची परंपरा आहे. सोहळ्यात ४५ दिंड्या असून ३५ ते ४० हजार वारकरी सहभागी होतात. पालखी सोहळ्यातील अडचणी सोडविण्याची मागणी नाथवंशज रघुनाथबुवा महाराज गोसावी पालखीवाले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना २८ मे रोजी मुंबईत निवेदन दिले आहे.