

Smart Meter Bill Issues
esakal
धाराशिव : कळंब मतदारसंघातील विद्युत ग्राहकांवर स्मार्ट मीटरमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा मुद्दा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील अनेक ठिकाणी ग्राहक अजूनही अडचणीत असल्याचे चित्र आहे. वाढीव वीजबिलांमुळे अनेकांची वीजजोडणी खंडित झाल्याने काही ठिकाणी गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत आहेत.