
छत्रपती संभाजीनगर : शालेय विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा चौथी आणि सातवीच्या वर्गापासून शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करताना अधिक सुलभता लाभणार असून, अतिरिक्त अभ्यासाचा मानसिक ताणही टळणार आहे.