

Paithan News
esakal
जायकवाडी: पैठण तालुक्यात निरक्षरता निर्मूलनाच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे. रविवारी (ता. २९) तालुक्यातील ३१ केंद्रांवर तब्बल ३५० निरक्षर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे ‘साक्षरता मूल्यांकन परीक्षा’ दिली. या परीक्षेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ५० ते ७० वयोगटातील आजी-आजोबा, आई-बाबा आणि काकूंनी दाखवलेली शिकण्याची प्रचंड जिद्द.