Aurangabad : यंदा गव्हाचा पेरा वाढणार

पैठण तालुका : सततच्या पावसाने मुबलक पाणीसाठा
Aurangabad
Aurangabad sakal

पैठण : ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस धो धो कोसळल्याने रबी हंगामात मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने यंदा तालुक्यात गव्हाचा पेरा वाढणार असल्याचे चित्र आहे. सध्या तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश शेतकरी खरीपच्या काढणीनंतर पाळी व रोडरवेअर करून रब्बी हंगामासाठी शेत तयार करून ठेवत असल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर कापसानंतर सोयाबीनची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. पिके बहरात असतानाच अचानक परतीच्या पावसाने सोयाबीनची काढणी सुरू असतानाच धुमाकूळ घातला. परिणामी सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तर कापसाचेही मोठे नुकसान झाले आहे. आता पावसामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने रबीत गहू आणि हरभरा लागवडीला शेतकरी पसंती देत आहे. तसेच करडी, सूर्यफूल, तीळ, जवस आदी कडधान्य काढणीसाठी मजूर आणि भाव नसल्याने या कडधान्य पिकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

रब्बी भरून काढणार नुकसान!

खरिपातील झालेले पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बीतील पिकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. हरबरा, गहू व ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक असणार आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. परिणामी, विहीर, बोअरला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. तसेच बाजारात सध्या गव्हाचे भाव वाढले असल्याने रब्बी गव्हाचा पेरा वाढणार असल्याचे कृषी विभागातील जाणकारांचे म्हणणे आहे.

रब्बीसाठी मिळणार अनुदानावर बियाणे

यंदाच्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना किलोमागे २५ रुपये या प्रमाणात अनुदानावर हरभरा बियाण्याची एक बॅग मिळणार आहे. यासाठी त्यांना पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. महाबीज, एनएससी व कृभको यांच्याद्वारे हे बियाणे उपलब्ध करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना ३० किलोची एक बॅग मिळणार आहे. यामध्ये कृषी विभाग ७५० रुपयांचे अनुदान देत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी दिली.

पेरणीपूर्वी बियाणे मिळावे;शेतकऱ्यांची अपेक्षा

उत्पादकता, क्षेत्रवाढ आणि सुधारित बियाण्याचा वापर व प्रसार आदी उद्देशाने कृषी विभागाद्वारे योजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केल्यास, त्यांना लॉटरी पद्धतीने लाभ मिळतो. यात बियाणे व निविष्ठांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा व ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारा (महाबीज) शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे उपलब्ध करण्यात येत आहे. किमान पेरणीपूर्वी बियाणे मिळावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com