
पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर): नाशिक जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेला मुसळधार पाऊस, तेथील धरणांतून होत असलेला विसर्ग आणि गोदावरी नदीला आलेल्या पुराचे पाणी झेपावल्यामुळे आधीच ९५ टक्के भरलेल्या येथील जायकवाडी (नाथसागर) धरणातून गुरुवारी (ता. २१) सकाळी आठपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.