Water Tanker : बाराशे गावांसाठी दीड हजार टॅंकरने पाणी

मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
water tanker
water tankeresakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आठ जिल्ह्यांतील तहानलेली १,१९३ गावे आणि ४५५ वाड्यांना तब्बल एक हजार ७५८ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टंचाई ही छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांना जाणवत आहे.

गेल्यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने खरीप पिकांना त्याचा मोठा फटका बसला. पाण्याअभावी रब्बी पिकांनादेखील फटका सहन करावा लागत आहे. मध्यंतरी काही मंडळांत अतिवृष्टी झाली; पण त्याचा फारसा फायदा प्रकल्पातील जलसाठावाढीसाठी झाला नाही. उलट रब्बी पिकांसह फळबागांचे मात्र नुकसान झाले.

दुसरीकडे पाण्याअभावी तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून विभागातील दोन हजार ७३४ विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.