उत्पन्न मिळणार नाही या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास

शेतकरी बाळकृष्णा भगवान चौधरी
शेतकरी बाळकृष्णा भगवान चौधरी

सोयगाव (जि.औरंगाबाद) : खरिपाची विदारक स्थिती आणि पावसाने फिरविलेली पाठ यामुळे करपलेला हंगाम पाहून नैराश्य आलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने (Farmer Suicide) दोरीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता.१८) जरंडी (ता.सोयगाव) (Soygaon) शिवारात घडली. या प्रकरणी महसूल (Aurangabad) प्रशासनाने नोंद घेतली असून सोयगाव पोलिस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जरंडी शिवारातील अल्पभूधारक शेतकरी बाळकृष्णा भगवान चौधरी (वय ३८) यांची जरंडी शिवारात गट क्रमांक २९३ मध्ये शेती आहे. त्यांनी ठिबक सिंचनावर कपाशीची लागवड केली होती. परंतु पावसाने पाठ फिरविल्याने कपाशी पिकाची स्थिती नाजूक झाली आहे.

शेतकरी बाळकृष्णा भगवान चौधरी
औरंगाबादेतील वाढत्या गुंडगिरीवर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

यामुळे उत्पन्न हाती येणार नाही, असे मनाशी ग्रह करून कर्ज फेडण्याच्या विवंचनेमुळे शेतातच झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची सोयगाव पोलिस ठाण्यात शेतकरी आत्महत्येची नोंद करण्यात आली असून घटनेचा पंचनामा जमादार संतोष पाईकराव, रवींद्र तायडे, शिवदास गोपाल आदींनी केला आहे. बाळकृष्णा यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com