

Legislative Advocacy: Challenging the Salary Disbursement System
Sakal
चित्तेपिपंळगाव : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना थेट वेतन का दिले जात नाही? त्यांना टप्प्याटप्प्याने वेतन देण्याची पद्धत का ठेवण्यात आली आहे? असा सवाल सरकारला विचारत या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा प्रभावीपणे मांडला जाईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. "हे अधिवेशन तुमचे, तर पावसाळी अधिवेशन आमचे," अशा शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्याध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विश्वास दिला.