

आष्टी (ता. १७): जुन्या वादातून बीड जिल्ह्यातील वाहिरा येथे झालेल्या भीषण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गुरुवारी (ता. १६) रात्री सशस्त्र टोळक्याने तीन सख्ख्या भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला असून, तिसरा भाऊ गंभीर जखमी आहे.