

Beed News
esakal
बीड: जिल्ह्यात बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिके आणि फळबागांचे अतोनात नुकसान केले आहे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे सुमारे ६०० एकर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून, वीज पडल्याने १२ जनावरे दगावली आहेत. महसूल प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारी मदतीकडे लागले आहेत.