
गेवराई : गेवराई (जि.बीड) उन्हाळी बाजरीचे खळे चालू असतांना मळणी यंत्रात महिला गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मळणी यंत्रात गेल्यानंतर महिलेचे शिर धडा वेगळे झाल्याची घटना तालुक्यातील संगम जळगांव येथे गुरुवार सकाळी घडली.
तालुक्यातील संगम जळगांव येथे गुरुवार रोजी सकाळी आठ वाजता बाजरीचे खळे मळणी यंत्रव्दारे चालू होते. मळणी यंत्रात बाजरी टाकत असतांना सुमित्रा सुदाम पांगरे (वय 30)वर्ष यांचा तोल गेला असता त्यांना मळणी यंत्राने आतमध्ये ओढले. यावेळी सुमित्रा पांगरे यांचे शिर धडा वेगळे झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.