

Women farmers from Bhivdhanora have set an example in water conservation and sustainable farming through the Paani Foundation competition.
Sakal
कायगाव : पाणी फाउंडेशन स्पर्धेत गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा गावातील कृषी कन्या शेतकरी महिला बचत गटाने एकजुटीचे दमदार उदाहरण घालून दिले आहे. उमेद अभियानांतर्गत 15 महिलांच्या या गटाने सामूहिक शेती, सेंद्रिय खत निर्मिती आणि जलसंधारण असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शेतीचा खर्च कमी केला आहे.