धाराशिव: भूम नगर परिषद क्षेत्रात आधीच सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर पुन्हा कोट्यवधींचा निधी खर्च करून सरकारी तिजोरीची लूट केल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कडक पवित्रा घेतला आहे. .संबंधित गुत्तेदाराला दिली जाणारी पुढील ५० कोटी रुपयांची रक्कम तातडीने रोखण्याचे आदेश न्या. विभा कंकणवाडी व न्या. हितेन वेणेगावकर यांनी दिले आहेत. तसेच, या प्रकरणात नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि राज्य शासनाला सखोल प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत जाब विचारला आहे..अबासाहेब मस्कर, संताजी सुपेकर आणि चंद्रमणी गायकवाड या स्थानिक नागरिकांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, भूम नगर परिषदेने ९ जून २०२३ रोजी सुमारे ९५.६२ कोटी रुपयांची ई-निविदा काढली होती. ही निविदा ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने’ अंतर्गत सिमेंट रस्ते आणि गटारींच्या कामासाठी होती..Dharashiv News: उन्हाचे चटके तीव्र, पाणीटंचाईचे सावट; कळंब; मोहा येथून पहिला प्रस्ताव दाखल.याचिकेतील गंभीर आरोपजुन्याच रस्त्यांचे नवे ‘नामकरण’: प्रशासक आणि शहर अभियंता यांनी संगनमत करून केवळ जुन्या रस्त्यांची नावे बदलून नवीन प्रस्ताव सादर केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. जे रस्ते अवघ्या ६ ते ८ महिन्यांपूर्वी किंवा २ वर्षांच्या आत पूर्ण झाले आहेत आणि जे आजही वापरण्यायोग्य आहेत, त्याच रस्त्यांवर पुन्हा सरकारी पैसा ओतण्याचा घाट घातला गेला. सरकारला सादर केलेली रस्त्यांच्या स्थितीची माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असून, ती केवळ आर्थिक लाभासाठी देण्यात आली असल्याचा आरोप आहे..Premium|Family Office: श्रीमंतांची संपत्ती पिढ्यानपिढ्या कशी टिकते..? फॅमिली ऑफिस हा काय प्रकार आहे..?.निवडणूक काळातील प्रशासकराज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने नगर परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. या काळात लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा घेऊन हा भ्रष्टाचार केल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच वर्षांमध्ये या ठिकाणी कुठलेही काम झालेले नसल्याची खात्री नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी करावी, असे असताना सुद्धा केवळ दोन वर्षांपूर्वी दुरुस्त झालेल्या रस्त्यांवर पुन्हा निधी वितरित केला. जनतेच्या पैशाचा अपव्यय केल्याचे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले आहेत. याचिकेकर्त्यांतर्फे ॲड. संभाजी टोपे व ॲड. गणेश कोरे हे बाजू मांडत आहेत. तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे आणि नगर परिषद भूमतर्फे ॲड. विक्रम उंद्रे हे बाजू मांडत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.