जालना - सरकारमध्ये तीन पक्ष बसले आहेत. राज्याच्या राजकारणात विकासाचा विचार बाजूला पडला आहे. समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करून राजकरण केले जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव घेतले जाते..परंतु, त्यांनी कुठल्याही समाजाविरोधात कधीच भूमिका घेतला नाही. त्यांनी मंडल आयोग लागू केला होता. शरद पवार हे एकमेव नेते आहेत, जे भाजपची खुर्ची घालवू शकतात. त्यामुळे भाजपला शरद पवार यांची भीती वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथे मंगळवारी (ता. नऊ) पत्रकार परिषदेत व्यक्त केले..शिंदे म्हणाले, ‘मराठा आरक्षणासंदर्भात शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंदोलनकर्ते समाधानी असतील. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हा निर्णय घेतल्याचे सरकार सांगत आहे. आमचे पूर्वीपासून तेच म्हणणे आहे. ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवून केंद्रातून मराठा आरक्षण दिले तर ते टिकू शकेल.’.आघाडी म्हणून निवडणुका लढवणारस्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार आहेत. स्थानिक नेते बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेतील. या निवडणुकांबाबत रणनीती आखण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.