
जालना : छत्रपती संभाजीनगर येथील बिल्डर सुनील तुपे यांच्या मुलगा चैतन्य तुपे मंगळवारी( ता.४) रात्री दोन कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली होती. या अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी जाफराबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी येथून बुधवारी (ता.५) दुपारी सुटका केली आहे. दरम्यान हे अपहरण प्रकरणातील तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.