माजलगाव : बालविवाह ही समाजाला लागलेली कीड असून ती मुळासह उखडून टाकण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. बीड जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढले असून त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कडक योजना राबविण्यात येत आहेत. .गावात बाल विवाह झाल्यास ग्रामसेवकावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिला. महसूल विभागामार्फत शुक्रवारी (ता. १३) माजलगावात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ते बोलत होते..यावेळी उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक उपस्थित होत्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले, सामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करणे हे आमच्यासारख्या अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे..Beed News : तत्त्वशील कांबळे यांचे अडीच दशकांपासून अविरत रक्तदान; ८५ वेळा दिले जीवनदान.यासाठी कामात दिरंगाई होणार नाही, यासाठी सर्व विभागांना सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेणे बंधनकारक आहे. फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही..बीड जिल्ह्यात घरकुलांची कामे मोठ्याप्रमाणात सुरु असून ते तत्काळ पूर्ण करून लाभार्थ्यांनी नवीन घरात दिवाळी साजरी करावी असा आमचा मानस आहे. शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जनतेला केंद्रबिंदू ठेवून अधिकाऱ्यांनी काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.