Satyamev Jayate Farmer Cup : चिंचोली येथील महिलांचा शेतकरी गट राज्यातून प्रथम, पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात फुलंब्रीची बाजी

Pani Foundation : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत चिंचोली येथील अन्नदाता महिला शेतकरी गटाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, तर महाल किनोळा येथील जय मल्हार महिला शेतकरी गट द्वितीय क्रमांकावर आला.
Satyamev Jayate Farmer Cup
Satyamev Jayate Farmer Cup Sakal
Updated on

फुलंब्री : पाणी फाउंडेशन च्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये महिला गटातून चिंचोली येथील अन्नदाता शेतकरी महिला गटाने राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर महालकिनोळा येथील जय मल्हार महिला शेतकरी गटानेही राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावून वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे चिंचोलीच्या महिला शेतकरी गटाला पाच लाख रुपये तर महाल किनोळा महिला शेतकरी गटाला तीन लाख रुपयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेता आमिर खान, पाणी फाउंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ यांच्या हस्ते देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com