हे शहर उजाळणार ‘एलईडी’ दिव्यांनी

file photo
file photo

नांदेड : शहरामध्ये उर्जा संवर्धनाच्या दृष्टीकोनातून विविध क्षमतेचे एलईडी दिवे नवीन वर्षामध्ये रस्त्यांवर बसविण्यात येणार आहेत. जुने पारंपारिक दिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी ‘एनर्जी इफीसिएन्सी सर्विसेस लिमिटेड’ (ईईएसएल) या कंपनीकडे महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी यांचा पाठपुरावा सुरु आहे. या प्रकल्पांतर्गत नांदेड शहरात २४ हजार ३५० नवीन एलईडी बल्ब (स्ट्रीट लाईट) बसविण्यात येणार असल्यामुळे नवीन वर्षात नांदेड शहर उजाळणार आहे.  

काय आहे ‘ईईएसएल’

राज्य सरकारच्या उर्जा संवर्धन धोरणानुसार उर्जा संवर्धन व वाढ करणे तसेच त्याची अमलबजावणी करण्यासाठी सरकारने १२ जानेवारी आणि चार जून २०१८ रोजी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांकरिता फक्त एलईडी पथदिवे बसविणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हीसेस (ईईएसएल) यांच्या माध्यमातून एलईडी पथदिवे बसविण्यासाठी राज्य सरकारने या कंपनीसोबत करारनामा केला आहे. या कंपनीने अनेक मोठ्या शहरांमध्ये एलईडी बल्बची योजना सवलतीच्या दरात अमलात आणलेली आहे. त्याच धर्तीवर नांदेड शहरातही २२ कोटी ६७ लाखांचा एलईडी बल्ब बसविण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे.

शहर झगमगटणार

विशेष म्हणजे या योजनेमध्ये महापालिकेला एकही रुपया गुंतविण्याची गरज नाही. किंबहुना शहरातील २२ हजार ८५० खांबांवर नवीन एलईडी बल्ब व एक हजार ५०० वाढीव बल्ब असे एकूण २४ हजार ३५० एलईडी बल्ब बसविण्यात आल्यानंतर सात वर्ष देखभाल दुरुस्तीची हमी संबंधीत कंपनीने घेतली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेला मात्र प्रत्येक महिना २५ लाख रुपये प्रमाणे २२ कोटी ६७ लाख रूपये सात वर्ष द्यावे लागणार आहेत. मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल देशमुख, उपअभियंता सतिश ढवळे यांनी या प्रकल्पाचे नियोजन केले आहे. हा प्रकल्प नुतन वर्षात अमलात येणार असून हे शहर एलईडीच्या प्रकाशाने झगमगाट'होणार आहे.

दृष्टीक्षेपात
 

०- सध्याचा विद्युत बिलापोटीचा वार्षिक खर्च चार कोटी ८० लाख रुपये.
०- ही योजना अमलात आल्यास एक कोटी २० लाख रुपयांची वार्षिक बचत.
०- ईईएसएल कंपनीला महापालिका देणार प्रति महिना २५ लाख रुपये  
०- एलईडी बल्बला विद्युत पुरवठा कमी लागणार आहे.
०- प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर मनपाची आर्थिक बचत होईल.
०- २२ हजार ८५० जुन्या खांबांवर एलईडी बल्ब बसवणार.
०- एक हजार ५०० नवीन एलईडी बल्ब बसणार
०- प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सात वर्ष देखभाल ईईएसएलकडेच राहणार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com