औरंगाबाद - प्रेषित मोहंमद पैगंबर यांनी शांती, सलोख्याचा मार्ग दाखविलेला आहे. हा शांतीचा संदेश सर्वांना कळावा यासाठी कुराण आणि प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या शांतीच्या संदेशावर आधारित स्पर्धा 'सकाळ माध्यम समूह' आणि स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे 10 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसाठी घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे कुपन 10 सप्टेंबरपासून प्रकाशित होणार आहेत.
स्पर्धेत मानवता, एकात्मता, शांतीच्या संदेशावर आधारित मजकूर दिला जाणार आहे. हा मजकूर वाचून त्यातून रोज विचारल्या जाणाऱ्या एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. स्पर्धेच्या कालावधीत एकूण 45 प्रश्न विचारले जातील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना कमीत-कमी 40 प्रश्नांच्या उत्तराचे मूळ कुपन आवश्यक राहील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही. यातील अचूक उत्तरे देणाऱ्यांना सर्व प्रश्नांचे कुपन एकत्र करून ठेवायची आहेत. स्पर्धा संपल्यानंतर सर्व कुपन जमा करण्यासाठी ठराविक कालावधी दिला जाईल. कुपन जमा करण्यासाठीचे काऊंटर सेंटर स्पर्धेनंतर लगेच जाहीर करण्यात येतील.
आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी
स्पर्धेत कमीत-कमी 40 प्रश्नांची अचूक उत्तर असलेल्या कुपनची एकत्रित करून सोडत काढली जाणार आहे. यामध्ये विजेत्यांना प्रथम पारितोषिक 31, द्वितीय 21, तृतीय 11 हजारांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. चतुर्थ बक्षीस 100 ट्रॅव्हल्स बॅग, उत्तजनार्थ 300 आकर्षक बक्षिसे राहणार आहेत.
स्पर्धेच्या अधिक माहिती व 'सकाळ'चा अंक सुरू करण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा :
औरंगाबाद- 9075006912, 9168814465, जालना- 9822910897, नांदेड- 9850993891, बीड- 9922920520, लातूर- 9822014900, उस्मानाबाद- 9423829785, परभणी- 9850698109, हिंगोली- 8830529600
अशी असेल स्पर्धा
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.