आमच्यासोबत यायचे की नाही हे काँग्रेसने ठरवायचे : आनंदराज आंबेडकर 

Anandraj Ambedkar
Anandraj Ambedkar

जालना : राज्यात काँग्रेसच्या निघलेल्या रॅलीपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या सभांना लाखोंची गर्दी होत, असून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत यायचे की नाही?  हे काँग्रेसला ठरवायचं आहे, असे रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे. सोमवारी (ता.25) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, 70 वर्षांनंतर सर्व आंबेडकरी चळवळीच्या विचारांचे नेते एकत्र आले आहे. त्यामुळे ज्या प्रस्तापितथांनी दलित आणि ओबीसी समाजाला सत्तेपासुन दूर ठेवले. त्या सत्तेत दलित आणि ओबीसी समाजाला बसविण्यासाठी राज्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे  वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसला यायचे की नाही हे काँग्रेसने ठरवायचे आहे, असे ही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी रामदास आठवले यांच्यावर ही निशानासाधला. आपली किंमत स्वतः कमी करायची नसते मात्र आठवले यांनी ती केली आहे. त्यामुळे त्यांच्या आज ही वेळ आल्याच ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com