

Dharashiv News
esakal
गौर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भालवडे वस्तीदरम्यानच्या रस्त्याचे काम रखडल्याने दहिफळ येथील ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वारंवार मागणी करूनही कामाला गती मिळत नसल्याने, अखेर ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध शड्डू ठोकला. १० एप्रिल रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.