लातूर - ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात या पिकाच्या लागवडीला घरघर लागली आहे. ३२ लाख हेक्टरवरून ज्वारीची लागवड दहा लाख हेक्टरवर आली आहे. राज्य कृषी मूल्य आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे.
आरोग्य आणि पोषणदृष्ट्या महत्त्वाचे असलेले ज्वारीचे पीक वाचविण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.