
औरंगाबाद: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील बारावी आणि दहावीच्या परीक्षा अनुक्रमे २३ एप्रिल आणि २९ एप्रिलपासून होणार आहेत. दरवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या या परीक्षा यंदा एप्रिल- मे महिन्यात होत आहेत. राज्यभर एप्रिल- मे महिन्यात कडक उन्हाळा असतो. त्यामुळे पेपरच्या वेळा बदलण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कडक उन्हाळा आणि राज्यातील अनेक भागातील वाढत्या तापमानाची परिस्थिती लक्षात घेऊन बारावी व दहावीच्या वार्षिक परीक्षा सकाळी लवकर म्हणजे सकाळी ८ वाजता सुरू करण्याबाबत नियोजन करावे, असेही सांगण्यात आले.
निवेदनावर माध्यमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख, अमरसिंग चंदेल, गणेश राठोड, विकास तावरे, विश्वास शेळके, ईश्वर खेडकर, सिद्धार्थ घुगे, भाऊसाहेब घोलप, श्याम खोसरे, परमेश्वर क्षीरसागर, दिलीप गायकवाड, संदीप तुंबारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.