

Hingoli Farmer Strike
esakal
हिंगोली: ‘विहीर चोरीला गेली आहे, ती शोधून द्या!’ ही तक्रार वाचताना एखाद्याला उपरोधिक वाटू शकेल. मात्र, सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील रामचंद्र खडसे या शेतकऱ्यासाठी हे जळजळीत वास्तव आहे. प्रशासकीय फायलींमध्ये ‘विहीर’ सजल झाली, तिचे बिल निघाले आणि संबंधिताचे खिसेही गरम झाले. मात्र, प्रत्यक्षात खडसेंच्या शेतात आजही कोरडी जमीन प्रशासकीय अनास्थेची साक्ष देत उभी आहे. याच भ्रष्ट व्यवस्थेच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. १३) धनगरवाडीत जो ‘विहीर आत्मक्लेश’ सोहळा पार पडला, त्याने केवळ हिंगोलीच नव्हे तर राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.