

Tanaji Sawant Demands Dry Drought Declaration in Dharashiv After Poor Rainfall Causes Major Kharif Crop Loss Across District
esakal
-धनंजय शेटे
धाराशिव: जिल्ह्यात यंदा अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे अनेक भागांत गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.