

Dharashiv News
esakal
धाराशिव: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानात न रमता संशोधक वृत्ती जोपासावी आणि नावीन्यपूर्ण क्षेत्रात आपले नाव उजळवावे, या उद्देशाने राष्ट्रीय आविष्कार अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद शाळांतील ६७ गुणवंत विद्यार्थी रविवारी (ता. १५) ‘इस्रो’च्या शैक्षणिक सहलीसाठी रवाना झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनांक घोष यांनी या सहलीच्या बसला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.