

Dharashiv News
esakal
धाराशिव: ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात धाराशिवकरांची पाण्यासाठी गैरसोय होत आहे. धरणांत मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही केवळ धाराशिव नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराचा पाणीपुरवठा आता पाच दिवसांऐवजी आता थेट आठ दिवसांआड होणार आहे. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी विदारक स्थिती सध्या धाराशिव शहरात पाहायला मिळत आहे.