प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा धरणावर एल्गार

mukramabad 1.jpg
mukramabad 1.jpg


मुक्रमाबाद, (ता.मुखेड, जि. नांदेड)ः तत्कालीन सरकारने लेंडी धरणात समाविष्ट असलेल्या अकरा गावांतील शेतकऱ्यांना ३० वर्षांपूर्वी कमी प्रमाणात मावेजा देऊन त्यांच्या जमिनी बळकावण्याचे महापाप केलेले आहे. यांच्या जमिनी काढून घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांना वाढीव मावेजा न देताच धरणाचे बांधकाम चालू करण्याचे षङयंत्र सरकार कडून रचले जात आहे. पण, जोपर्यंत येथील शेतकऱ्यांना २०१३-१४ च्या कायद्याप्रमाणे शेतीचा वाढीव मावेजा शासन देणार नाही, तोपर्यंत धरणाचे एक इंचही बांधकाम होऊ देणार नाही, असा इशारा आमदार डॉ. तुषार राठोड यांनी गुरुवारी (ता. २०) लेंडी धरणावरून सरकारला दिला आहे.


या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे सरपंच राजू पाटील रावणगावकर, हणमंत पाटील भासवाडीकर, बाळासाहेब देशमुख, बालाजी पाटील, जफर पटेल, शादुल पाटील, जैनुद्दिन पटेल, रमेश खंडागळे, रामेश्वर आप्पा, बालाजी पाटील, शिवाजी पाटील, शंकर पाटील, पप्पू हासनाळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार डॉ. राठोड म्हणाले की, ‘‘येथील शेतकरी हा वाढीव मावेजा द्या म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून खितपत पडलेला आहे. पण जिल्ह्यातील व तालुक्यातील श्रेयवादाच्या राजकारणामुळे मावेजा मिळालेला नाही. हे शेतकऱ्यांसाठी फारच दुर्देवी बाब आहे. 


हेही वाचा -  आजी आमदारांची माजी आमदार पुत्राच्या ‘बुलेट’वरून सवारी
येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अधिवेशनात मी शेतकऱ्यांचे तारांकित प्रश्न उपस्थित करून वाढीव मावेजा सरकार कडून घेतल्याशिवाय परत येणार नाही. तर जोपर्यंत शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मिळवून देणार नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवा. बाधित बारा गावांतील प्रकल्पग्रस्तांचे पहिले पुनर्वसन, मगच धरण, या धोरणाची अंमलबजावणी सरकारला करण्यासाठी भाग पाडू. शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे आयुष्य उद्‍ध्वस्त करून त्या ठिकाणी धरण उभे करावे, असे कोणतेही न्यायालय सांगत नाही. त्यामुळे पहिले बाधित कुटुंबाचे समाधान, मगच पुढे धरणाचे बांधकाम, अशी यापुढे भूमिका असणार आहे.’’
 


येत्या २३ मार्चपर्यंत शासनाने आम्हाला २०१३-१४ च्या कायद्यानुसार वाढीव मावेजा नाही दिला तर आम्ही आकरा गावाती शेतकरी व प्रकल्पग्रस्त मिळून महाहातोडा मोर्चा लेंडी धरणावर काढून झालेल्या धरणाचे बांधकाम पाडू. यात आमचा जीव गेला तरी चालेल; पण आम्हाला आमचा वाढीव मावेजा हा मिळालाच पाहिजे.
- राजू पाटील रावणगावकर, सरपंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com