वसमत - वसमत तालुक्यातील माळवटा येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविची घटनी घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात सोमवारी ता. २८ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील माळवटा येथील तरुण शेतकरी बापुराव रुख्माजी नादरे (वय-३२) यांना माळवटा झिवारातच पाच एकर शेती आहे, या शेतीवरच त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो..या शेतीवरच त्यांनी वसमत येथील दोन बँकेकडून कर्ज घेतले होते मात्र मागील काही वर्षापासून कधी पावसामुळे तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे पिक हाती आलेच नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही..दरम्यान, नापिकीमूळे लागवडीचा खर्च निघाला नाही त्यामुळे उदरनिर्वाह कसा करावा तसेच कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. कर्ज व नापिकीमुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आता कर्ज फेड करणे शक्य होणार नाही अशी भिती त्यांच्या मनात होती..त्यामुळे त्यांनी घरी कोणी नसतांना घरातील टीनपत्राखालील लाकडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यांचे कुटुंबिय शेतातून तातडीने घरी आले..घरी मयत बापुराव यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याप्रकरणी रुख्माजी नादेर यांनी सोमवारी ता. 28 वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात माहिती दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक एकनाथ डक, जमादार विजय उपरे पुढील तपास करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.