गेवराई - बीड जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस कोसळत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका गेवराईला बसला असून, हातातोंडाशी कापणीला आलेले सोयाबीन आणि कपाशीचे मुख्य पिक धोक्यात सापडले आहेत..त्यातच गेवराईच्या बेलगावातील शेतक-याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात या शेतक-याने कृषी मंत्री साहेब असेच हाल राहील्यास जीवन संपविल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा या शेतक-याने दिला आहे..गेवराईच्या बेलगावातील जगनराम किसन हा घरची शेती कमी असल्याने दुस-याची शेती कसतो. यंदाची शेतीची पावसाने केलेली परिस्थिती पहाता पूर्ण शेतात पाणीच पाणी झाले आहे. कापणीला आलेले सोयाबीन काळाठिक्कर पडले असून, शेंगाला मोड देखील फुटले आहेत. तुरीच्या काड्या झाला तर कपाशीची दोड्या सडल्या आहेत..या सर्व पिकाची परिस्थिती पहाता शेतकरी जगनराम याने चक्क शेताच्या पाण्यात उतरून कृषी मंत्री दत्तामामा भरणे बाहेर पडा, शेतक-याचे हाल बघा, आता शेतातील पूर्ण पिक वाया गेल्यात जमा झाले आहे. मुलाचे शिक्षण कसे करणार, वर्षाचा घरप्रंपच कसा करायचा, आता आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहीला नाही असा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करून त्याने सरकाराला इशारा दिला आहे..ई-पिक पाहणीवर केला संताप -सरकारने आता ई-पिक पाहणी केल्यावर अनुदान,पिकविमा अदी भरपाई देणार असे सरकार सांगते. यंदा तर त्याचे सर्व्हर डाऊन असल्याने माझ्या शेतातील पिकाची पाहणी झालेली नाही. त्यामुळे सरकारने याकडे भानगडीत न पडता सरसकट कर्जमाफी, पीक विमा देण्यात यावा यावर देखील शेतकरी जगनराम याने संताप व्यक्त केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.