Jal Samadhi Protest: जायकवाडी फुगवट्यामुळे २० वर्षांचे शेती नुकसान; लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे जलसमाधी व उपोषण मागे

जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे दोन दशकांपासून पिकांचे मोठे नुकसान; भरपाई, संपादन व एफटीएल हद्द निश्‍चितीच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण मागे
The Battle for Justice: Farmers Protest Against Crop Loss Due to Jayakwadi Dam Backwater

The Battle for Justice: Farmers Protest Against Crop Loss Due to Jayakwadi Dam Backwater

Sakal

Updated on

कायगाव : जायकवाडी धरणाच्या फुगवट्यामुळे गंगापूर तालुक्यातील अंमळनेर व लखमापूर परिसरातील शेतजमिनीचे गेल्या वीस वर्षांपासून नुकसान होत असून भरपाई व संपादनाची मागणी करूनही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी सोमवारी (ता.१८) गोदावरी पात्रात नऊ तास जलसमाधी आंदोलन केले. प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल न घेतल्याने त्याचे रूपांतर बेमुदत उपोषणात झाले होते. मात्र बुधवारी (ता.२०) महसूल प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com