‘या’ जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या

Shetkari
Shetkari

नांदेड : सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थाबंण्याचे नाव घेत नाहीत. यंदा (ता.एक) जानेवारी ते आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी जिवन संपविले. मागील वर्षी ९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता. मागच्या तुलनेत यंदा २४ आत्महत्या जास्त झाल्या आहेत. या घटनेतील ९९ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र तर १२ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. ११ प्रकरण चौकशीसाठी प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. याच काळात नोव्हेंबरमध्ये आठरा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात मागील सतरा वर्षापासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात २०१४ पासुन वाढ झाली. सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचे हत्यार उपसत आहे. या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात. अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्याचे धोरणही राबविल्या जाते. जिल्हा प्रशासनही आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रीत ‘प्रयास’ करत आहे.

सतत चार वर्ष ‘दुष्काळाशी सामना
जिल्ह्यात सतत चार वर्ष शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला. कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी. यातुनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला खरीप हंगाम हातून जातो. यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. या परिस्थितीत शेतकरी कोलमडून पडल्यामुळे ते टोकाचे पाऊल उचलतात.

या वर्षात १२२ आत्महत्या
जिल्ह्यात २०१९ मध्ये आजपर्यंत १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी - सात, फेब्रुवारी दहा, मार्च दहा, एप्रील तीन, मे १२, जून ११, जुलै ११, ऑगष्ट १३, सप्टेंबर नऊ, ऑक्टोबर सात व नोव्हेंबर १८ तर डिसेंबरमध्ये आठ घटना घडल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. याच काळात नोव्हेंबरमध्ये आठरा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

सहा वर्षात ८६१ आत्महत्या
सहा वर्षांत ८६१ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यात २०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षातील १२२ घटना घडल्या. यातील ९९ शेतकरी कुंटूब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. १२ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच ११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com