

काळाचा घाला! देगलूर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी; शेतात काम करताना ५२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
Sakal
देगलूर : तालुक्यातील मौजे कावळगाव येथील शेतकरी गंगाधर पोचिराम सोनाकांबळे (वय ५२) यांचे आज दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास उष्माघाताने निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या उष्णतेमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.