

Beed News
esakal
घाटनांदूर: सूर्यास्त झाला की गावातील गजबजलेल्या बसस्थानकावर भयाण शांतता आणि काळोखाचे राज्य सुरू होते. हा काळोख केवळ प्रकाशाचा अभाव नाही, तर तो प्रवाशांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरतोय. हजारो विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णांची धावपळ आणि व्यापाऱ्यांची लगबग ज्या ठिकाणाहून होते, ते घाटनांदूरचे बसस्थानक आज प्रशासकीय दुर्लक्षाच्या गर्तेत अडकले आहे. बसची वाट पाहताना प्रवाशांना आता वेळ नाही, तर आपला जीव सांभाळण्याची चिंता करावी लागत आहे.