

Beed News
esakal
घाटनांदूर: एकीकडे जग डिजिटल होत असताना ग्रामीण भागात आजही सरकारी पत्र हा विश्वासाचा मोठा आधार मानला जातो. मात्र, घाटनांदूर परिसरातील टपाल विभागाच्या गलथान कारभारामुळे हा विश्वास आता धुळीला मिळत आहे. घाटनांदूरसह उजनी, पट्टीवडगाव, साळुंकवाडी, पुस आणि गिरवली या ब्रांच अंतर्गत येणाऱ्या हजारो नागरिकांना सध्या टपाल सेवेच्या अनागोंदीचा सामना करावा लागत आहे.