Residents have expressed concern over the lack of flood preparedness and awareness measures by the local administration.
Sakal
कायगाव : नाशिकच्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून सोडण्यात आले पाणी गुरुवारी (ता.9) पहाटे 4 वाजता जुने कायगाव (ता.गंगापूर) येथे गोदावरी नदीत दाखल झाल्याने नदीला या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. नदीपात्र ओसंडून वाहू लागल्याने पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.