

Jalna News
esakal
शहागड: शहागड आणि वाळकेश्वर येथे गोदावरी नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याची पाणीपातळी अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात शहागड परिसराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जायकवाडीतून गोदापात्रात पाणी सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.