Soybean Procurement : अडीच लाख शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर; नोंदणी करूनही सोयाबीनची खरेदी नाही

Soybean Procurement: बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कमी झाल्यामुळे शासनाने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू केली होती. मात्र, या केंद्रांचा कार्यकाल साडेचार महिन्यांच्या दरम्यान अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.
Soybean Procurement
Government starts soybean procurement centers amid falling market pricesEsakal
Updated on

लातूर : बाजारपेठेत सोयाबीनचे भाव पडल्याने शासनाने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू केली. पण, रडत पडत ही केंद्रे साडेचार महिने चालविण्यात आली. कधी बारदाना नाही म्हणून केंद्रे बंद राहिली, तर कधी धिम्या गतीने खरेदी सुरू राहिल्याने आठ-आठ दिवस वाहनांच्या रांगा लागल्या. असे करीत शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली. यात नोंदणी करूनही राज्यात अडीच लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झाले नाही. यात मराठवाड्यातील दीड लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. शासनाने खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची किंवा भावातील फरक देऊन दलासा द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com