pratap sarnaik
sakal
येरमाळा - धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकरी यांच्यासोबत सहकुटुंब दिवाळी साजरी करण्याचा निर्णय पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतला आहे. १४ व १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सहकुटुंब येणार असुन ते शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ,शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य ते दिवाळी दौऱ्यात मदत म्हणुन देणार आहेत.